देशाची औद्योगिक स्थिती मजबूत करण्यासाठी ‘मेड इन महाराष्ट्र’ची हाक

मुंबई– प्रत्येक उद्योगपतींनी किमान एक तरी प्रकल्प आणावा, आम्ही तो सुरु करण्यासाठी तातडीने कार्यवाही करू , असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजने आयोजित केलेल्या संवादात ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील उपस्थित होते. अध्यक्ष सुनील माथुर यांनी सूत्रसंचालन केले. तर हर्ष गोयंका, जमशेद गोदरेज , नौशाद फोर्ब्स, थियागराजन यांनी आपले विचार मांडले.

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या वातावरणातही उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावीशी वाटते आहे हे फार महत्वाचे आहे. अशा सर्व उद्योग आणि गुंतवणूकदारांचे आम्ही स्वागतच करू.कालच आम्ही १६ हजार कोटी रुपये गुंतवणूकीसाठी करार केले आहेत. महाराष्ट्र हे आपले घरच आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या दृष्टीने मेड इन इंडिया तर आहेच पण महाराष्ट्राचे देखील एक वैशिष्ट्य असावे. एखादी वस्तू, उत्पादन हे “ मेड इन महाराष्ट्र” असावे, याठिकाणी उत्पादने सुरु व्हावीत यासाठी आम्ही पुढे जाणार असून प्रत्येक उद्योगपतींनी त्यांच्या मनातले किमान एक एक प्रकल्प आमच्याकडे घेऊन यावेत. आम्ही या प्रकल्पांना तातडीने सुरु करण्याची कार्यवाही करू.

जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम ही कार्य पद्धती आपल्याला कायमस्वरूपी अवलंबता येईल जेणे करून कोरोना नंतरच्या काळातले आपले जीवन सुरक्षित आणि व्यवस्थित राहील हे ही आपल्याला पहावे लागेल

मुंबईत ५० टक्के लोक झोपड्यांत राहतात. माझ्या वडिलांनी एकेकाळी या झोपडीधारकाला घर देण्याचे स्वप्न पाहिले होते. निश्चितच आमच्यासाठी या कोरोना नंतरच्या काळात हा प्राधान्याचा विषय राहील.

धारावीसारख्या झोपडपट्टीत कोरोनामुळे काय हाहाकार माजेल असे वाटले होते पण आम्ही खूप प्रयत्न केले आणि संसर्ग रोखला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कामही आमच्या प्राधान्यक्रमात आहे.

येणाऱ्या काळात ऑनलाईन व्यवहारांचे आणि एकूणच दूरसंचारला येणारे खूप जास्त महत्व लक्षात घेता राज्यात सर्वदूर दर्जेदार आणि गतिमान नेटवर्कचे जाले उभारण्यात येईल.

सध्या औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना देखील काही अडचणी असतील तर त्या दूर करणे तसेच या क्षेत्रांची परिस्थिती चांगली करण्यावर भर दिला जाईल.

महाराष्ट्रात काम करणारे परराज्यातील मजूर, कामगार त्यंच्या त्यंच्या राज्यात परत गेले आहेत. आम्ही त्यांना जा म्हणून सांगितले नाही. पण आता महाराष्ट्रात आम्ही कमान सुरुवात केली आहे, उद्योगही सुरु झाले आहेत. राज्याच्या अगदी कानाकोपर्यात आम्ही जाहिराती देऊन मनुष्यबळ उलब्ध होईल, आणि येथील लोकांना नोकऱ्या देऊन कामे थांबणार नाहीत असे पाहू

कृषीवर आधारित उद्योग, शीतगृह साखळी, शेतमालाचे विपणन यासारख्या गोष्टीना देखील प्राधान्य दिले जाईल.

सीआयआय यांनी विद्यापीठाचा प्रस्ताव तयार केला आहे, तो त्यांनी लवकरात लवकर सादर करावा , आम्ही त्यावर निर्णय घेऊ.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!