भीमा खोर्‍यात 80% पाणी, उजनीला पाणी देणारे काही प्रकल्प भरले तर अन्य वधारू लागले

पंढरपूर- भीमा खोर्‍यात टेलएन्ड असणार्‍या उजनी धरणाला पाणी देवू शकणारी वरील धरणे आता भरू लागली आहेत. भीमा खोर्‍यात सरासरी 80 टक्के जलसाठा झाला आहे. सध्या खडकवासला, मुळशी यासह अन्य धरणातून थोड्याप्रमाणात पाणी सोडले जात असल्याने पुणे बंडगार्डनचा विसर्ग वधारून साडेबारा हजार क्युसेक इतका झाला आहे. दरम्यान वरील प्रकल्प क्षमतेने भरत आल्याने आता पुन्हा मोठा पाऊस झाल्यास उजनीला याचा फायदा होईल.
भीमा खोर्‍यातील 19 धरणांमध्ये सरासरी 80 टक्के पाणी असून पाच प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तर काही धरण ही शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. उजनी प्रकल्प 69 टक्के भरला आहे. मुळशी, खडकवासला यासह अन्य धरणातून थोड्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने पुणे बंडगार्डनचा विसर्ग 12 हजार 400 क्युसेक इतका झाला आहे. उजनीला पाणी देवू शकणारी धरणे वधारत आहेत. आज ही अनेक प्रकल्पांवर मध्यम स्वरूपाचा पाऊस नोेंदला गेला आहे. यात पवना धरणावर 82 मि.मी., वडीवळे 67, मुळशी 77, टेमघर 44, पानशेत 45, खडकवासला 16, आंध्रा 44 मि.मी. यासह घोड उपखोर्‍यातील धरणांवर किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
भीमा खोर्‍यातील खडकवासला, पानशेत, मुळशी, आंध्रा, कळमोडी ही धरणं शंभर टक्के भरली आहेत. तर कासारसाई 98, पवना 82.45, वडीवळे 95.88, भामा आसखेड 78.50, चासकमान 83.45 टक्के भरले आहे. मुळा मुठा साखळी धरणातील टेमघर 77 तर वरसगाव 93 टक्के भरले आहे. पानशेत शंभर टक्के भरले असल्याने यातून 1980 क्युसेक पाणी खडकवासल्याकडे सोडण्यात आले आहे. घोड उपखोर्‍यातील प्रकल्प वधारत असून येडगाव व वडज धरणे नव्वद टक्क्याहून अधिक भरले आहेत तर डिंभे 83 व घोड धरण 72.35 टक्के भरले आहे.

नीरा खोर्‍यात 98 टक्के पाणीसाठा झाला असून गुंजवणी 97, देवघर 93, तर भाटघर, वीर व नाझरे शंभर टक्के भरले आहे

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!