महाराष्ट्र बचाव आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या संख्येवरून काँग्रेसची भाजपावर खोचक टीका

मुंबई- भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवारी केलेले आंदोलन साफ फसले असतानाही लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. यात आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी सहभागी झालेल्यांच्या संख्या वाढीचा वेग पाहता १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच सहभागी झाल्याचे दिसले असते. यापुढे प्रेसनोटसोबत भाजपाने त्यांच्या पसंदीचे एखादे पाचक (अन्न पचण्यासाठी वापरले जाते उदा. हाजमोला )मोफत वाटावे, अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, आंदोलनासंदर्भात भाजपाने संध्याकाळी ७.०९ वाजता काढलेल्या प्रेसनोटमध्ये राज्यभरातून अडीच लाख कार्यकर्ते सहभागी झाले होते असा दावा केला गेलाक् आणि त्यानंतर ८.५६ वाजता काढलेल्या दुसऱ्या प्रेसनोटमध्ये अडीच लाख कुटुंब व ८ लाख ७५ हजार ४८७ लोक आंदोलनात सहभागी झाल्याचे म्हटले आहे. १ तास ४७ मिनिटात आंदोलकांचा आकडा ६ लाख २५ हजार ४८७ ने वाढल्याचे दाखवण्यात आले असून याचा मिनिटात हिशोब केला तर प्रत्येक मिनिटाला ५ हजार ८४२ आंदोलक वाढत गेले आहेत. याच वेगाने भाजपा गणित करत राहिला तर १५ दिवसानंतर अख्खा महाराष्ट्रच आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा करता आला असता. आंदोलनाकडे लोकांनीच काय पण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही पाठ फिरवल्याचे संबंध राज्याने पाहिले असताना भाजपाचा हा दावा पोकळ व हास्यास्पद असल्याचे दिसते. भाजपाला खोटे बोलण्याची सवयच लागलीय, सतत खोटे दावे करणे आणि नंतर तोंडावर आपटणे हे त्यांच्या अंगवळणी पडले आहे. असे सावंत म्हणाले.
कोरोनाच्या संकटात सरकारशी सहकार्य करुन एकजुटीचे दर्शन घडवण्याऐवजी भाजपाने केलेले आंदोलन महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात रुचलेले नाही. परंतु गर्वाचा फुगा फुटला असतानाही त्यांना वास्तवाचे भान राहिलेले दिसत नाही. भाजपाची एकूण कृती पाहता ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच आहे, असा टोलाही सावंत यांनी लगावला.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!