ऊसबिल- पगारी थकविणारे , शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द करणाऱ्यांना मतदारच धडा शिकवतील : शैला गोडसे

पंढरपूर – विधानसभा पोटनिवडणुकीतील दोन्ही साखर कारखानदार चेअरमननी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यांची ऊसबिल थकीत ठेवली आहेत. कामगारांचे पगारी देत नाहीत. अशा उमेदवारांना मत मागण्याचा अधिकार नाही. जनता हुशार आहे. ती या उमेदवारांनी केलेले पाप सहन करणार नाही. आपला राग मतदानाच्या रुपाने उघड केल्याशिवाय रहाणार नाही, असा विश्वास महिला उमेदवार शैला गोडसे यांनी व्यक्त केला.
तळसंगी,मरवडे ,येड़्राव येथे शैला गोडसे यांच्या प्रचारसभा झाल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचारासाठी केंद्रीय मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री व अन्य नेते येथे येऊन जनतेचे, शेतकऱ्यांचे कल्याण करु असे म्हणत आहेत.इतके दिवस झोपी गेलेले हे नेते आता या मतदारसंघात येऊन जनतेचे प्रश्न सोडवू म्हणतात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. पस्तीस गावच्या पाण्यासाठी कधी आंदोलन न करणारे भूमिपूत्र म्हणवून घेत आहेत. भूमिपूत्र कधीही शेतकऱ्यांची ऊसबिल अडवून ठेवत नसतो.त्यांचे सभासदत्व रद्द करत नसतो, अशी टीका गोडसे यांनी केली.
दुसरे दादा उमेदवार कामगारांच्या पगारी थकविणारे ,शेतकऱ्यांचे ऊसबिल न देणारे आहेत. ते आता वारसदार म्हणून आमदारकी मिळवू पाहात आहेत. अशा नेत्यांना या निवडणुकीत पराभूत करा. मला एकवेळ जनतेची सेवा करण्यासाठी, पस्तीस गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी, बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी विधानसभेत जाण्याची संधी द्या. शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्या, असे आवाहन सौ.शैलाताई गोडसे यांनी केले.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!