अखेर उजनीवर पर्जन्यराजा बरसला

पंढरपूर – गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने उजनी जलाशयावर हजेरी लावली असून सकळपर्यंत ३६ मिलीमीटरची नोंद झाली आहे. हे धरण उपयुक्त पातळीत ६१.०३ टक्के भरले आहे.
पावसाने गेल्या महिनाभरापासून भीमा परिसरात व पर्जनक्षेत्रात पाठ फिरवली होती. यामुळे चिंतेचे वातावरण होते. पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. रविवारी रात्रौ उजनी जलाशयावर पावसाने हजेरी लावली. आजवर या पावसाळ्यात उजनीवर एकूण ३३४मि.मी. पाऊस झाला आहे.
धरणात ९६.३६ टीएमसी पाणी असून यात उपयुक्त साठा ३२.७० टीएमसी इतका आहे. धरणात येणारी पाण्याची आवक केवळ १९७६ क्युसेक इतकी आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!