उजनी भरतेय पण मंदगतीने!, भीमा खोर्‍यात समाधानकारक पाणीसाठा, पाऊस आहे पण प्रमाण जरा कमी..

उजनीत एकूण पाणीसाठा 81.43 TMC
उपयुक्त साठा 17.77 TMC
टक्केवारी 33.17%

पंढरपूर – भीमा नीरा खोर्‍यातील पाऊस पूर्णतः थांबला नसून तो मध्यम स्वरूपात अनेक प्रकल्पांवर कोसळत आहे. यामुळे धरणं समाधानकारक पाणी पातळीत भरत आहेत. दौंडची आवक मंदावल्याने उजनीचा टक्केवारीच्या पन्नाशीकडील प्रवास हळूहळू सुरू आहे. धरण उपयुक्त पातळीत 34 टक्क्यांच्या जवळ पोहोचले आहे.

उजनीत दौंडजवळून येणारी आवक ही कमी होवून आता 17 हजार 996 क्युसेक इतकी झाली आहे. याचे कारण म्हणजे भीमा खोर्‍यात कमी झालेले पावसाचे प्रमाण व वरील धरणांमधून सोडण्यात येणार्‍या पाण्याचे कमी केलेेले प्रमाण आहे. खडकवासला प्रकल्पाचे दरवाजे आता बंद करण्यात आले आहेत. कलमोडीमधून 1270 क्युसेक तर वडीवळे 587, आंध्रा 1462 तर कासारसाईमधून 250 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. खडकवासलामधून पाणी सोडणे बंद झाल्याने पुणे बंडगार्डनचा विसर्ग कमी झाला आहे.

मागील चोवीस तासात पवना धरणावर 117 मि.मी., वडीवळे 87, कासारसाई 33, मुळशी 69, टेमघर 95, वरसगाव 60, पानशेत 64, खडकवासला 30, कलमोडी 45, भामा आसखेड 37, डिंभे 41 यासह नीरा खोर्‍यात गुंजवणी 74, देवघर 74, भाटघर 37 मि.मी. अशा पावसाची नोंद आहे.

मागील पाच दिवसात झालेल्या पावसाने भीमा व नीरा खोर्‍यातील प्रकल्प वेगाने भरले आहेत. मुळा व मुठा खोर्‍यातील प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला आहे. यात टेमघर 61 टक्के, वरसगव 73,पानशेत 84, खडकवासला 97 टक्के. यासह कलमोडी व आंध्रा धरण 100 टक्के भरले आहे. मोठे धरण असणारे मुळशी 66.13 तर पवना 80 टक्के भरले आहे. भीमेवरील चासकमानमध्ये 75.37 जलसाठा झाला आहे. वडीवळे 84.21, भामा 79 टक्के भरले आहे. घोड उपखोर्‍यातील पिंपळगावजोगे सोडले तर अन्य प्रकल्पात पाणीसाठा वेगाने होवू लागला आहे. घोड धरण 25.33 टक्के भरले आहे.

नीरा खोर्‍यात झालेल्या मुसधार पावसाने गुंजवणी 86.66 तर देवघर 88 तर भाटघर 61.31 आणि वीर 97.18 टक्के भरले आहे. वीरमध्ये मागील धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने आज पहाटे या धरणातून 13 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!